कविता:🌷”रहाट-गाडगे”


कविता : 🌷 " रहाट-गाडगे "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

पाणी म्हणजेच जीवन, भरणे-रिक्त होणे...
चाले सातत्याने, कधीकधी होते जीवघेणे...
क्षणभंगुरता जीवनातली, कठीण उमजणे...

आयुष्य म्हणजे, जणू एक रहाट-गाडगे…
जीवनातील प्रत्यक्ष चढ-उतारच दर्शविते…
एकीकडे तुडुंब भरते, क्षणातच रिक्त होते...

एका बाजूने पाणी उपसले जात असते,
दुसऱ्या बाजूने घडे रिकामे करत असते...
सुख-दु:खाचे धडेच जणू शिकवत असते...

कधी अनंत-अदृष्य-हस्ते भर-भरून देते...
एखाद्या अभाग्याचे नशिबच फळफळते...
तर कधी होत्याचे पार नव्हते होऊ शकते…

कधी आनंदाची सुखदायी लहर पसरवते…
कधी-काळी दुःखाचे प्रचंड डोंगर उभारते…
मन-बुध्दि-शरिर सर्व मग, सुन्न-बोथट होते…

कधी मनामध्ये घन-दाट धुके-धुकेच पसरते…
अचानक सगळे कसे फिके-फिकेसे भासते...
बळे-बळे जगून, खोटे-खोटे हसणे फक्त उरते…

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!