कविता :🌷’ पवित्र बंध ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : बुधवार, ३० ऑगस्ट २०२३
वेळ : १२ वाजून १२ मि.
रक्षाबंधन अन् माहेर आहे जणू अद्भुत-जादू-रसायन
श्रावण-पौर्णिमेला यथासांग, साजरा करतात हा सण
स्त्री वयाच्या कुठल्याही उंबरठ्यावर जरी असली तरी,
जपते माहेरचे ऋणानुबंध अन् दोन्ही घरची नाती-गोती
माहेरच्या ओढीने त्याचं महत्त्व वाढत जातं कैक पटीनं,
‘माहेर’चं हृदयस्थ असतं एक खास स्थान त्याच्या परीनं
भाऊ म्हणजे बालपणापासूनचा सुख-दु:खांचा सोबती
त्यामुळे ते नातं अतूट-मायेचं-जवळचं-अन्-आनंददायी
बहिण-भाऊ हे एकमेव असं नातं, जे निखळ प्रेरणादायी
गुण-दोषांसकट एकमेका सांभाळून हे चिरंतन सुखदायी
भाऊ लहान असो वा मोठा, कायम देतो भक्कम आधार
राखी बांधल्याने याच कोमल भावना होती प्रत्यक्ष साकार !
सिकंदरच्या पत्नीने, हिंदू-सम्राट-पुरूला राखी-बंधू मानला,
अलेक्झांडरला जीवदान देत, जणू पुरूने बंधू-धर्म पाळला !
बळीराजास रक्षा-सूत्र बांधून, लक्ष्मीने त्यास भाऊ बनविला !
तिच्या सन्मानार्थ बळीने स्वर्ग-लोकी जाऊ दिले श्रीविष्णुला
रक्षासूत्र बांधण्याचा तो पावन दिन होता श्रावण-पौर्णिमेचा,
आजवर रक्षाबंधन-सण-साजरा, हेतू स्मृती जतन करण्याचा
वेद-पुराणकाळापासून चालत आल्या अनेक प्रथा पूर्वापार,
मन:पूर्वक पालन केल्यास दृढ होती हे पवित्र-बंध-अपरंपार !
निसर्ग-रक्षण-चिन्ह, अग्रमानाची राखी-तुळस-कडुलिंबाला
पंच-पक्वान्न-पूजारती हाती,आतुर बहिणा औक्षण करायला !
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply