कविता – 🌷 “दुसरं मागणं नसे ईश्वरापाशी”
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – २८ सप्टेंबर २०१६
सळसळणारं हे नव-तारुण्य …
जणू बहरुन आलं नवं-लावण्य …
स्वर्गच भासे मज घन-अरण्य …
सारी सुखं उभी, कांही नसे नगण्य …
फुलां-परि सारं-कांही ताज-टवटवीत वाटतंय …
झुळुकीच्या झोक्यावर आज डोलावंसं वाटतंय …
इवल्याशा दव-बिंदूलाही खूप-खूप जपायचंय …
मन-मोहक भ्रमराला गुंगवायंचंय-गुंतवायचंय …
गुण-गुण गुंजारवाच्या तालावर,
प्रसन्नतेची हलकीच उठतेय् लहर …
तन-मन धुंद-फुंद होऊन उमलतंय …
मज कळीचं जणू रूपांतरण होतंय …
सुरेख रंगीबिरंगी सुमना-समान वदन …
चहू-दिशानी आनंदी-आनंद ओसंडून …
वाहतोय मंद-सुगन्ध फुलां-फुलांमधून …
अवघी धरणी-माय तेजाळली तृप्तीतून …
का गोड गुलाबी-लाज उतरे अशी गाली ? …
जणू रविस भेटण्या संध्या सजली-धजली …
कुणी बरं लावली ओठांस आज ही लाली …
सजले-नटलेे आज मी-लेवून कुंकुम भाळी …
प्रत्येक श्वास झाला आहे सुगंधी …
रात्रीच्या प्रहराची अजुनही धुंदी …
क्षण-न-क्षण मन झालंय आनंदी …
जीवनी, नव-पर्वाची ही तर नांदी …
वाटे हा सुवर्ण-काळ, संपूच नये कधी …
सृष्टी देखील सामील, राहून त्या साक्षी …
अशीच सुखाची, संतत-धार बरसावी …
दुसरं काहीच, मागणं नसे ईश्वरापाशी …
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🌅🕉🌷
Leave a Reply