कविता :🌷 भ्रम आणि वस्तुस्थिती
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
खूपदा माणसाच्या डोक्यात वेगळी हवा शिरते,
वाटते, "पान हलत नाही आपल्यावीण कुणाचे..."
प्रत्यक्षात मात्र वस्तुस्थिती फारच निराळी असते...
भ्रामक-कल्पनांच्या विश्वात-भ्रष्ट मति गुंग असते...
कुणीही आहे म्हणून किंवा कुणी नाही म्हणूनही,
विश्वातील कोणाचं, कधीही काहीच अडत नाही...
चंद्र-सूर्य-वृक्ष-वेली-फुलं-पानादि सृष्टीचे ऋतु-चक्र,
चोखपणे पाळतात, निसर्गाने-आखलेले-वेळापत्रक...
अडत नाही आई-विना, पोरा-बाळांचं सुध्दा काही...
प्रेमळ कुणी नंद-यशोदा अत्यंत मायेने सांभाळती...
पत्नी नाही म्हणून विधुराचंही कांहीच नाही अडत...
शुभ-कार्यी कनवटीला सुपारी लावून काम भागतं...
पतिवीण विधवा स्त्रीचंही तसं फारसं अडत नाही...
ओटीत श्रीफळ ठेऊन साधू शकते ती कार्यसिद्धी...
असे असूनही, वात्सल्य-प्रेमभावच प्रभावी ठरतात...
एक-एकटे पति-पत्नी, कर्तव्य निभावंतंच जगतात...
पत्नीच्या पश्चात मुलांचे आई-व-बाप दोन्ही होतात...
आईची उणीव लेकरांना, अजिबात भासू न देतात...
पति नाही म्हणून, स्त्रिया पेलतात संपूर्ण जबाबदारी...
नोकरी-व्यवसाय सांभाळूनच मुलांवर सुसंस्कार करी...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply