कविता :🌷' शाश्वत आनंद ' कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले तारिख : सोमवार, ३ जुलै २०२३
जन्मा-आधीपासून शिक्षण सुरु होतं पुढे अनंत काळा-पर्यंत सुरुच रहातं ! शिकविणारे सगळे गुरु-जन, सद्गुरु जन्मदाते-माता-पिता हेच आद्य-गुरु !
आयुष्यभरात अगणित होतात सद्गुरु व्यक्ती-प्राणी-पुस्तकं-निसर्ग वा वास्तु सद्गुरु हे शिष्यांसाठी जणू 'कल्पतरु' ज्ञानदान-यज्ञ व आशिर्वचन 'तथास्तु' !
सिध्दपदासाठी दत्तगुरुंनी २४ गुरु केले प्रत्येक गुरुच्या उत्तम-गुणांचे ग्रहण केले नीर-क्षीर-विवेकाने वाढते गुण-ग्राहकता, व्यक्तिविकास होऊन वृध्दिंगत गुणवत्ता !
काही अंतस्थ-हेतूने, कधी नाईलाजाने... 'एका'चा गुरु होणे द्रोणाचार्यांनी टाळले पण निराश न होता, चिकाटीने-जिद्दीने... एकलव्य-श्रेष्ठ-धनुर्धर-झाला, निर्धाराने !
परशुरामांसम-परमगुरु मिळवण्यासाठी, शूर-वीर कर्णाने, लपविल्या काही गोष्टी मिळवूनही ज्ञान-युद्ध-कौशल्य-रणनीती, खोटेपणामुळेच गुरु-शाप मिळाला अंती !
सांदिपनी ऋषींच्या गुरुकुल-आश्रमात, श्रीकृष्ण-बलराम दोघेही झाले निष्णात अध्ययनाने त्यांनी, ज्ञान केले आत्मसात शंखासुर-वध करुन वाचविले गुरु-पुत्रास
Leave a Reply