तारिख – ३० डिसेंबर २०१६
कवितेचं नाव-🌷” सु-संस्कारांचं सिंचन “…
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तेव्हाची गोष्ट आहे ही …
सर्वां,असं वाटायचं,की …
जेव्हा पालक आणि पाल्यं,सर्वांनाच,
” गाईड्स “वापरणं, नामुष्कीची गोष्ट,
“कोचिंग-क्लासला”जाणं,शरमेची-गोष्ट …
जेव्हा शिक्षक,”टुशन्स”साठी धडपडायचे नाहीत,
किंवा तसा सल्लाही विद्यार्थ्याना द्यायचे नाहीत
“शिकवणं”हा एकमेव,”नोबल- प्रोफेशन” …
असं सर्व-सामान्यपणे,प्रत्येकास वाटायचं …
वास्तवीक,आजच्या तुलनेत,तेव्हा शिक्षक,
मासिक-वेतनाच्या बाबतीत,खूपच उपेक्षित …
तरीही,त्यांचं शिकवणं,पोट-तिडीकिनं,
नेहमी असायचं,अत्यंत आपले-पणानं,
आपल्या हातूनच नवीन-पिढी घडतेय …
भविष्यातही घडणार आहे,
अशा एकाच,उदात्त भावनेनं
भारलेला,असा तो शिक्षक-वर्ग …
निदान सर्व शाळांमध्ये तरी,प्रामाणिकपणा,
कडक-शिस्तं असूनही मायेचा,आपलेपणा
हेड-मास्तर व शिक्षक यांचं एकमेव ध्येयं,
“उत्तम- विद्यार्थी “चांगले-नागरिक घडवणं …
त्यामुळं सतत सुंदर कल्पना,
नवं-नवीन गोष्टिंच्या योजना …
अभिनव प्रयोग,संकल्प,उपक्रम,राबवंणे …
आधुनिक, नवं-स्पर्धांचं आयोजन करणे …
सर्व विद्यार्थ्याच्या,सुप्त-गुणांना पारखणे …
त्यांच्या कलागुणांना,योग्य,प्रोत्साहन देणे …
त्या काळात ” फर्स्ट-क्लासला “…
म्हणजेच साठ-टक्के गुणांना,
खूप मान-सन्मान, मिळायचा …
कौतुकास-पात्र समजून,
आदरानं पाहिलं जायचं …
कारण ,९५ टक्के गुण …
तेव्हा दिले जात नसत …
गणित,सायन्स,संस्कृत या विषयांत,
पैकीच्या- पैकी, गुण मिळू शकायचे …
अन्य विषयांत कापून गुण मिळायचे …
अशा काळात,
आमच्या शाळेच्या,हेड-मास्तरांनी,
विद्यार्थ्याना “मोटिवेट ” करण्याची,
एक अभिनव-शक्कलच, लढवली …
ज्या विद्यार्थ्याला ८० टक्के वा अधिक-गुण,
त्याचं ठळक-नाव शाळेच्या भिंतीवर कायम,
प्रत्येक इयत्तेतील,पहिल्या पाच क्रमांकाच्या,
विद्यार्थ्यात,त्यामुळे चांगलीच चुरस लागलेली …
की, कोण ही अट सर्वांत आधी पूर्ण करतंय …
ही चुरस मात्र,फारच” हेलदी “स्वरूपाची होती
” भिंतीवर नाव-लागणे “याचा खरा अर्थ-काय,
समजण्याचं वय नसलं तरी,ते महत्वाचं आहे,
एवढं अस्मादिकांना नक्कीच समजत होतं …
शिवाय वर्ग- शिक्षक व शिक्षिका माझ्यावरच,
त्यांच्या सगळ्या-आशा होत्या,केंद्रित करून …
त्यांची मी “फेवरीट”असं सगळ्यांना वाटायचं …
योगा-योग असा की,आईच्या आशीर्वादाने,
त्याच वर्षीच्या वार्षिक परीक्षेत, ८६ टक्के,
एकूण गुण,अस्मादिकांना मिळालेही होते …
माझ्या ठळक नावाची, लाकडी- पाटी,
पेंट करून,खूप उत्साहात,बनविली गेली
मुख्य अतिथिंकडून भिंतीवर लावली गेली …
भव्य समारंभ,कौतुकाची भाषणेही झाली …
सर्व शिक्षक वर्ग व माझ्या मैत्रिणींना,
प्रचंड आनंद व अभिमानच वाटला …
थोडी गंमतीची गोष्ट अशी की,
त्यानंतर कैक वर्षे कोणालाही,
त्या भिंतीवर,स्थान मिळालं नाही …
नंतर ती गोष्ट,साफ विसरून गेले …
कॉलेजचे सोनेरी दिवसही संपले …
जॉब,नंतर बिझनेसमधे रंगून गेले …
यथावकाश मग शुभ- लग्न झाले …
विशेष अशी घटना म्हणजे,
शाळा हे मतदान केंद्र होते,
माझे सासरचे- नातेवाईक,
मतदान करण्या,शाळेत गेले …
आल्यावर केवढ्या कोडकौतुकानं,
माझं नाव पाहिल्याचं वर्णन करून,
आल्या-गेल्या प्रत्येकाला होते सांगत …
मनातल्या मनात, मी आमच्या,
हेड-मास्तरांना,ज्यांची ही मूळ
संकल्पना, कोटी प्रणाम केले …
धन्य ते मुख्याध्यापक …
व धन्य-धन्य ते शिक्षक …
ज्यांनी अविरत श्रम करून,
सु-संस्कारांचंच केलं सिंचन …
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply