कविता : 🌷” सम्भवामि युगे युगे “


कविता :🌷 " सम्भवामि युगे युगे "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

"यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥"
"परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥"

आजच्या शुभ दिवसाचं आहे अनन्यसाधारण असंच महत्त्व
वैशाख मास शुद्ध तृतीया, तिथी आहे "अक्षय-आणि-अनंत "
अर्थात् कधीही नाश न पावणारी अशी संपदा म्हणून अक्षय,
या शुभ दिनी त्रेतायुग-प्रारंभ झाला होता, हाच खरा आशय

जेव्हा सज्जनांचा छळ-अन्यायादी करुन दुष्ट अधर्मी माजतात,
भगवत् गीतेतील श्लोकानुसार ईश्वर अवतार घेऊन प्रकटतात
धर्म:पतन थांबवून सुजनांची रक्षा करण्या, श्रीविष्णु प्रकटतात
युगे-युगे जन्म घेऊन दुष्ट-दानव-दैत्यांचा समूळ विनाश करतात

ईश्वर जसे अवतार घेतात, कलियुगात राक्षस रुपं धारण करतात
लाच-लुचपत-अन्याय-शोषण-दारु-अफू-व्यसनादी रुपांनी येतात
अधम वृत्तींचा समूळ नि:प्पात करुन, शांति प्रस्थापित करण्यास,
सुधर्म पुन:स्थापित करण्यास भूवरी पुनःपुन्हा भगवंत अवतरतात

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!