कविता :🌷’ शाश्वत-आनंद ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : सोमवार, ३ जुलै २०२३
वेळ : रात्रीचे ८ वाजून २३ मि.
जन्मा-आधीपासून शिक्षण सुरु होतं
पुढे अनंत काळा-पर्यंत सुरुच रहातं
शिकवणारे सगळे गुरु-जन, सद्गुरु !
जन्मदाते-माता-पिता हेच आद्य-गुरु !
आयुष्यभरात अगणित होतात सद्गुरु
व्यक्ती-प्राणी-पुस्तकं-निसर्ग वा वास्तु
सद्गुरु हे शिष्यांसाठी जणू ‘कल्पतरु’ !
ज्ञानदान-यज्ञ व आशिर्वचन ‘तथास्तु’ !
सिध्दपदासाठी दत्तगुरुंनी २४ गुरु केले
दर गुरुच्या सर्वोत्तम-गुणांचे ग्रहण केले !
दुर्गुण दुर्लक्षुन जोपासली गुण-ग्राहकता,
व्यक्ति-विकास होऊन, वाढेल गुणवत्ता !
कधी अंतस्थ-हेतूने, कधी नाईलाजाने
एकाचा गुरु होणं टाळलं द्रोणाचार्यांनी
निराश न होता-अंतस्थ-सद्गुरु-भक्तिने
एकलव्य झाला श्रेष्ठ-धनुर्धर, परिश्रमाने !
परशुरामांसम-गुरु प्राप्त करण्यासाठी,
शूर-वीर कर्णाने लपविल्या कैक गोष्टी
मिळवलं ज्ञान-युद्ध-कौशल्य-रणनीती
गुरु-सेवा करुनही शाप मिळाला अंती !
सांदिपनी ऋषींच्या गुरुकुल-आश्रमात
श्रीकृष्ण-बलराम दोघेही झाले निष्णात
अध्ययनाने त्यांनी ज्ञान केले आत्मसात
शंखासुर-वध करुन वाचविले गुरु-पुत्रास
गंगातीरी आदि-शंकराचार्य चालत होते
गंगेच्या दुसऱ्या तीरी काही शिष्य होते
गंगातटी उमलत्या-कमळांचा पूल झाला !
शिष्य पाण्यावरुन चालत गुरुकडे आला !
सद्गुरु शिक्षण-देऊन अंती परिक्षा घेतात
गुरु-परीक्षेत तरून जीवन यशस्वी करतो
कुमार नरेंद्र पुढे स्वामी विवेकानंद बनतो !
नम्र समर्थ-शिष्य, कल्याण-स्वामी होतो !
गुरु-धौम्य-ऋषींच्या आज्ञा पालनासाठी
रात्री बांध बनून आडवा राहीला आरुणी !
गुरु-चाणक्य यांची-प्रतिज्ञा-पूर्ण करण्या,
चंद्रगुप्त-मौर्याने स्व-आयुष्य लावले पणा !
ज्यास सद्गुरु-लाभ झाला ते खरे भाग्यवंत
आत्मज्ञान-प्राप्ती व सहवासात साधु-संत !
गुरु-मार्गदर्शनाने जीवन होईल पूर्ण-सफल
शाश्वत-आनंदाने तिढे सारे होतील सरळ !
@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply