कविता – 🌷 ” व्यथा- सिकंदरची “
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – २९ नोव्हेंबर २०१६
एखाद्या ध्येयानं पार पछाडून जाणं …
म्हणजे स्वतःला सिकंदर समजणं …
जगज्जेता बनण्याच्या एका स्वप्नानं …
त्याच्या आयुष्याला जंगजंग पछाडलं !
या एका गोष्टीने त्यास पुरतं वेडं करुन टाकलं …
जिंकण्याचं वेड त्यानं त्याच्या सैन्याला पटवलं …
अन् वेड लावून लढायला जय्यत तयार केलं
त्या एका अट्टाहासासाठी उभं आयुष्य वेचलं …
स्वतःचं आयुष्य व संपूर्ण
सैन्यातल्या प्रत्येकांचच
आयुष्य, होरपळवलं …
सरते-शेवटी त्याचं आयुष्य,
एक सजाच होतं बनलं …
मृत्यू-शय्येवर, मरणाची वाट पाहात …
स्व-मातृभूमी पासून लाखोंमैल दूर
स्व-प्रिय-जनां पासून योजने दूरवर
स्वतःच्या आयुष्याचा चित्रपट पाहात …
किती- किती देशांना जींकले,
किती- लाखों जणांना मारले,
किती रक्ताचे पाट वाहवले …
किती- लोकांना बंदी बनवले,
किती- किती खजिने लूटले …
काय संपत्ती,पैका हिसकावले …
किती सोनं- नाणं गोळा केले …
किती शिव्या- शाप पचवले …
किती असहाय जना लुबाडले …
आयुष्याचा होम करून,काय मिळवलं …
काय गमावलं, याच्या हिशोबाचं गणित
कधी न सुटणारं अत्यंत कठीण -कोडं,
किती असहाय वाटलं असेल कदाचित …
वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षी …
स्वप्नांचा पाठ-पुरावा करण्या ऐवजी,
विष-बाधेमुळं, निर्बल, मरणा-सन्न,
पडलेल्या त्याला, हसावं की रडावं …
असा यक्ष-प्रश्न खचितच पडला असणार …
त्या” जगज्जेता “बनू पाहणाऱ्या सिकंदरला …
ज्याच्यासाठी केला होता अट्टाहासं …
क्या बचा जो रह गया तुम्हारे- पास …
न यहं शरीर किसिका है …
न कोई शरीरका हुआ है …
शरीर तो अग्नी,जल,वायू,
पृथ्वी, आकाशसे बना है …
उनही पंच-तत्वोमे पुनः मिल जायेगा …
मिट्टीका जो बना,मिट्टीमें मिल जायेगा …
Leave a Reply