कविता : 🌷’ मानस-वारी ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख शुक्रवार, ९ जून २०२३
वेळ : संध्याकाळी, ७ वाजून ३मि.
एकाच स्थितीमध्ये चित्त, मन, शरीर, बुद्धी कंटाळते
विरंगुळा म्हणून स्थिती बदलायला धडपडत असते
कधी हवा-पालट म्हणून थोडीशी गंमत हवीशी वाटते
कधी तीर्थ-क्षेत्री दर्शन-यात्रेची आतुरता वाटत असते
आषाढी एकादशीला पंढरपूरला भक्तीभावाला पूर येतो
भारतभरातून सर्व स्तरांतून भक्त-समूह पायी-पायी येतो
लाखोंच्या संख्येने नाचत-गात ‘स्व’चे भान विसरुन येतो
स्त्री-पुरुष-आबाल-वृद्ध-शेजारी-पाजारींसह पोहोचतो !
ज्या ज्या कुणाला तीव्र इच्छा असूनही ती मारावी लागते,
त्यांचे फक्त शरीर कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असते,
मन मात्र दिवस-रात्र वारकरी संप्रदायाबरोबर फिरत असते
पंढरपूरी विठ्ठल-रखूमाईच्या दर्शनासाठी आसुसलेले असते !
मनात तीव्र इच्छा असेल तर ‘मानस’-यात्रा सहजच घडू शकते !
त्यासाठी फक्त आंतरिक ओढ व खरी तळमळ वाटली पाहिजे
मनस्वी-ओढीने सूक्ष्म-शरीर जगाच्या पाठीवर कुठेही पोहोचते
कैलास मानसरोवर यात्रा करुन-पंढरपूरची वारीही पूर्ण करते !
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply