कबीरा-घरी शालू-शेले विणून, मदत-रूप झाला संशयी-राणानं विषाचा प्याला मीराबाईला दिला विष-पेयाचं अमृत करुनी मीरेचा जीव वाचविला तिच्या भजन-गीतांतून, सदैव प्रकट होत राहीला...
एकनाथांनी आणलेले गंगा-जल पिण्याकरिता मरणासन्न गर्दभाच्या रुपात प्रकटला तो दाता महालाची पंचपक्वान्ने सोडून निभावली मित्रता, मित्र सुदाम्याच्या पोह्यांचा आनंद लुटता-लुटता...
तुकारामांच्या भेटीला शिवाजी-राजे गेले होते, संधी-साधून मुघल सैनिकही तिकडे पोहोचले हे पाहून तुकारामांनी विठ्ठलाला सांकडे घातले, सर्वच-श्रोते एकसे दिसले, राजे सुखरुप राहीले...
अगणित आहेत भक्ति-रसाच्या विलक्षण गोष्टी जोवर आहेत सूर्य-चंद्र-ग्रह-तारे व अवघी सृष्टी कधीही-कुठेही-कुणाच्यातरी रुपात मदतीसाठी, भक्त असता संकटी, धावून सोडवितो जगजेठी...
Leave a Reply