कविता : 🌷 ” न भूतो न भविष्यति “


कविता : 🌷 " न भूतो न भविष्यति "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

त्याकाळी मुघल शासकांच्या जाचाने रयतेची गेलेली रया
अत्याचारांच्या भीतीने घराबाहेर पडत नव्हत्या आयाबाया...
घालीत होत्या देवाला साकडं, "आता ये, कर बाप्पा दया"...

शिवनेरी किल्ल्यावर आनंदोत्सवाची झाली आतिशबाजी...
देवी शिवाईच्या कृपेमुळे म्हणून पुत्राचं नाव ठेवलं शिवाजी !
जिजाऊंनी शिवरायांवर केलेल्या संस्कारांनी मारली बाजी...

दादोजींनी युद्धकला-घोडेस्वारी-राजकारणात-केलं-तरबेज...
समर्थांनी स्वधर्म-मनोबल-गनिमी कावा-शिकविले डावपेच...
जिजाऊंचा आदेश "कर्तव्य-पालनाने अन्याय-कारींना ठेच"...

बालपणी-शिवाजी मावळ्यांचा नेता बनून किल्ला करी सर...
पुढे प्रत्यक्षात शर्थीने लढून अनेक किल्ले केले त्यांनीच सर...
म्हणतात ना, "बाळाचे पाय पाळण्यात दिसतात"अगदी खरं...

'तोरणा' जिंकून मराठा-साम्राज्य-मुहूर्तमेढ भक्कम रोवली...
मुघल शासकीय अघोरी अन्यायांतून जनतेची सुटका केली...
निडरपणे कावेबाज शाहिस्तेखानाची बोटंच छाटून टाकली...

कट-कारस्थानी-क्रुरात्मा-अफझल खानास यमसदनी धाडले...
मराठा-साम्राज्याच्या कट्टर शत्रूंच्या-सैन्यालाही-पाणी-पाजले...
शिवबाची यशोगाथा पाहून, मोगल बादशहाचे धाबे दणाणले...

मंगल दिनी शिव-राज्याभिषेक-सोहळा थाटात संपन्न झाला...
विनयी-नम्र-महाराजांनी यशाचं-श्रेय दिलं मातोश्री जिजाऊंना...
समर्थ-रामदास-स्वामींनी-दिलेल्या-भगव्या-लहानशा-कापडाला,
हिन्दू-शिवशाही-साम्राज्याचा-"भगवा-झेंडा"असा सन्मान-दिला...

पन्नास वर्षांच्या आयुष्यात "न भूतो न भविष्यति"-कार्यसिद्धी...
"नभात सूर्य-चंद्र-तारे" तोवर महाराजांची-अपार-अनंत-किर्ती...
भावी-पिढ्या कायम गातील-शूर-शिवाजी महाराजांची-महती...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!