कविता - 🌷 " दोष कुणाचा ? "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
उदारतेचं मूर्तिमंत असं उदाहरण ...
म्हणजेच "सूत-पुत्र-कौंतेय-कर्ण" ...
हाती नसे कुणाच्या पोटी जन्मणं ...
पूर्ण महाभारतात कर्णाच्या इतका,
पराक्रमी-शूरवीर-लढवैय्या योद्धा
शोधूनही कधीच नाही सापडणार ...
दुर्दैवाचा फेरा, कर्णाच्या जन्माच्या
आधी-पासूनच सुरु झाला असावा ...
विशेष वरदान प्राप्त झाले कुंतीला ...
त्यामुळे सूर्य-देव आले मंत्र म्हणता
कुमारी-माता कुंती अन् सूर्य यांचा,
तेजस्वी-मनस्वी-अद्वितीय पुत्र हा ...
तत्कालीन-समाज-टीकेला घाबरुन
कुमारी मातेने रुढींपुढे मान तुकवून
मातृत्व-भावनांना पायदळी तुडवून ...
दुसरं काही करणे, शक्यच नसताना
तिने-मन-मारुन-तिच्या-तान्हुल्याला ...
कायमचे त्यागले नवजात बालकाला ...
गुपचूप सोडलं-अजाणत्या अर्भकास
लाकडी पेटीतून वाहत्या जलाशयात ...
केले"काळं-कृत्य-रात्रीच्या-अंधारात ...
भविष्याचा कोणी काय अर्थ लावावा?
कोणी कुणाच्या कुशीत जन्म घ्यावा ?
ना माहित कुणी, कुणाला दोष द्यावा ?
🌷@तिलोत्तमा विजय लेले
Leave a Reply