तारिख – २८ सप्टेंबर २०१६
कवितेचं नाव – 🌷”दुसरं मागणं नसे ईश्वरापाशी”
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
सळसळणारं हे नव-तारुण्य …
जणू बहरलेलं नवं-लावण्य …
स्वर्गच भासे मज घन-अरण्य …
सारी सुखं उभी, कांही नसे नगण्य …
फुलां-परि सारं-कांही ताज-टवटवीत वाटतय …
झुळुकीच्या झोक्यावर आज डोलावंसं वाटतंय …
इवल्याशा दव-बिंदूलाही खूप-खूप जपायचंय …
मन-मोहक भ्रमराला गुंगवायंचंय-गुंतवायचंय …
गुन-गुन गुंजारवाच्या तालावर,
प्रसन्नतेची हलकीच उठते लहर …
तन-मन धुंद-फुंद होऊन उमलतंय …
मज कळीचं जणू रूपांतर होतंय …
सुरेख रंगीबिरंगी सुमनासमान वदन …
चहू-दिशानी आनंदी-आनंद ओसंडून …
वाहतो मंद-सुगन्ध फुला-फुलामधून …
अवघी धरणी-माय तेजाळली तृप्तीतून …
का लाज उतरे अशी गोड गुलाबी गाली …
जणू रविस भेटण्या संध्या सजलीधजली …
कुणी बरं लावली ओठास आज ही लाली …
सजले-नटलेे आज मी लेवून कुंकुम भाळी …
प्रत्येक श्वास झाला सुगंधी …
रात्रीच्या प्रहराची अजुनी धुंदी …
क्षणनक्षण मन झालं हे आनंदी …
जीवनी नव-पर्वाची ही तर नांदी …
वाटे हा सुवर्णकाळ संपू नयेच कधी …
सृष्टी देखील सामील राहून त्यां साक्षी …
अशीच सुखाची संतत-धार बरसावी …
दुसरं काहीच मागणं नसे ईश्वरापाशी …
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🌅🕉🌷
Leave a Reply