कविता : 🌷" दडलेले-ज्ञानामृत "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : रविवार, २१ जुलै २०२४
वेळ : सकाळी, ११ वाजून २१ मि.
आषाढ शुद्ध पौर्णिमेस गुरु-पौर्णिमा-दिन म्हणून गौरवितो
महाभारत-कर्त्या-महर्षी व्यासांचा जन्मदिन, साजरा होतो
आयुष्यामध्ये गुरुंचे आगमन म्हणजे थेट तेजाला आमंत्रण
मनातील अज्ञान,संशयरुपी अंध:काराचे होते पूर्ण उच्चाटन
सद्गुरु म्हणजे एकमेव-द्वितीय-जादूचं-अद्भुत-वाद्य, मृदंग
ज्याच्या झंकाराने निनादती अंत:करणी अनाहत-नाद-तरंग
सद्गुरुकृपा हे असे अद्भुत ज्ञान की ज्याच्या प्राप्ती-पश्चात्
नैसर्गिक-अनाठायी भयाचे होई-समूळ-निराकरण प्रत्यक्षात
सद्गुरु, एक अशी महा-नदी की ती पंच-प्राणांतूनही वाहते
अशी बासरी जिच्या मंजुळ नादे, मन आत्मानंदी मग्न होते
गुरु म्हणजे शुद्ध अमृत,मनातील विकार-रुपी-विष-नष्ट होते
या ज्ञानामृत-लाभे अंतरीची तृषा पूर्णतया शमते, हाव मिटते
गुरु म्हणजे कुबेराचा असा अक्षय-खजिना,मोल होणार नाही
गुरुकृपा-असा प्रसाद,जो लाभता कशाची इच्छाच उरत नाही
गुरु म्हणजे सत्-चित्-आनंद,जो"स्व"ची खरी ओळख घडवतो
गुरु अशी दीक्षा आहे की, दीक्षित व्यक्ती-भवसागर पार करतो
गुरु म्हणजे अविनाशी-ज्ञान-महासागर अन् शाश्वत-ज्ञान आहे
सद्गुरु कोणत्याही उपमेपेक्षा श्रेष्ठ, म्हणूनच "अनुपमेय" आहे
गुरुकृपेने ईश्वरी-अतिसूक्ष्म-सर्वव्यापी स्वरूपाची ओळख होई
काही अभाग्यांना गुरुकृपा होऊनही,ती झालेली समजत नाही
जशी हाती चिंतामणी लागल्याने, मनुष्याची मनोरथे पूर्ण होती,
तद्वत सत्गुरु-कृपा-लाभ होता,दडलेले-ज्ञानामृत मिळूनही होती
खरी गुरुपूजा-गुरुदक्षिणा म्हणजे बोध, गुरु-ज्ञान जे प्राप्त झाले,
जी शिकवण मिळाली, पूर्णतः जीवनी प्रत्यक्षात आचरण करणे
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply