कविता – 🌷” चैतन्य “


कविता - 🌷"  चैतन्य "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - 19 ऑक्टोबर 2024

19 ऑक्टोबर 1920 रोजी रोह्याला, पांडुरंग शास्त्री आठवले हे चैतन्य अवतरलं
मनुच्या माशासारखं पाचही खंड व्यापून ज्ञान-दान-यज्ञाचं कार्य अविरतपणे केलं

तत्वज्ञान हा विषय पुस्तकी नसून, दैनंदिन जीवनाला देव-सन्मुख करणारा राजपथ
भक्ति म्हणजे नसे केवळ कर्मकांड, भगवंतापासून विभक्त नाही तोच खरा देवभक्त

प्रत्येक मनुष्याच्या हृदयात स्थित आहे भगवंत म्हणूनच माणसाचे शाबूत अस्तित्व
" सर्वस्यचाहं हृदि संन्निविष्ट "अर्थात तो विश्व-नियंता परमेश्वर कायम स्वरूपी स्थित

" अहं ब्रह्मास्मि " हे महा-वाक्य म्हणजे जणू सामान्य-साधकांची हक्काचीच काठी
मनात ठाम निर्धार हा की आमच्या समवेत आहे अशी महा-शक्ति जी चालवते सृष्टी

"वैश्विक स्वाध्याय परिवारातून" अध्यात्मिक-ज्ञान सोपं करून भक्तिचं समाजीकरण
मनुष्य-गौरव-प्रदाता-दादांना आजच्या "मनुष्य गौरव दिनी" शत-शत-लक्ष-लक्ष वंदन

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!