कविता – 🌷’ खरं कसब ‘
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
दिनांक – २ जानेवारी २०२३
वेळ – सकाळी ११ वाजून २६ मि.
बघता-बघता सरुन गेलं,
जुनं-पानं मावळतं वर्ष …
नव आशा-आकांक्षांचं,
आलं-आलं हे नूतन वर्ष !
राग, रुसवे-फुगवे सारेच …
गेले घाबरून दूर पळून,
नव्या उमेदीने क्षणन्-क्षण
जगूया आता भरभरून !
कडू-गोड, चुकलं-माकलं …
सगळं-सगळं माफ करून,
नूतन वर्षाला सामोरे जावू,
झालं-गेलं सर्वच विसरून !
सरलेलं ते जुनं वर्ष होतं …
जणू एक जुनंच पुस्तक,
पूर्ण वाचून मनन करून …
भलतंच गरगरलं मस्तक !
आता आयतं हातात पडलंय,
नवं करकरीत असं हे पुस्तक …
३६५ पानांमधून सुवर्ण लुटून,
मग होऊ आपण नत-मस्तक !
” केल्याने होत आहे रे “
” आधी केलेची पाहिजे “
श्री समर्थांचे हे सार्थ-वचन,
आचरणात आणले पाहिजे !
आयुष्य कितीही जरी मिळालं,
तरीही सदैव ते तुटपुंजं वाटतं …
“उद्याला करु” असं म्हणंत-म्हणंत,
अवघं आयुष्य सरून जाऊ शकतं !
“कल करे सो आज कर”,
” आज करे सो अब ! “
जगूया अर्थपूर्ण-सुंदर-जीवन,
त्यातच दडलं आहे खरं कसब !
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply