कविता – 🌷 ‘ अश्वत्थामा ‘
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – शनिवार, २७ जानेवारी २०२४
वेळ – रात्री ८ वाजून २६ मि.
माणसं अशी विचित्र का वागतात …
ठीक असून, खुसपटं का काढतात …
यालाच का “सुख बोचणे” म्हणतात ?
स्वत:चा न्यूनगंड कुरवाळत बसतात …
दुसऱ्याला सदा कमी लेखू पाहतात …
अन् त्यातच धन्यता मानत राहतात …
दुसऱ्याला फसवणं फार सोपं असतं …
स्वत:च्या मनात मात्र ते सलतच राहतं …
शरिराची इजा औषधांनी भरुन येते …
मनात खोल, जखम भळभळत राहते …
वरवरची मलमपट्टी कामी येतच नाही …
जखमांवर खपली कधी धरतंच नाही …
असे अतृप्त जीव ‘अश्वत्थामा’ बनतात …
जन्मोजन्म तेल मागत हिंडतच बसतात …
‘करावे तसे भरावे’त्यांना उशिराने कळते …
पण हातातून वेळ निसटून गेलेली असते …
माणूस वेळीच जर, माणुसकीनं वागेल …
पृथ्वीवरही स्वर्ग-सुख-प्राप्त करु शकेल …
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply