झाडा-झाडातून वारा येई वाजवीत शीळ कोणी टाकली, चमकत्या आभाळी नीळ ? नकळत मनोमनी कोणी ही घातली भूल ? कोण जाणे राधेला असं कसं लागंलं खूळ ?
ऐकूनी श्री हरिची मधुर मुरली, वेडी राधा घर-दार विसरली ... जणू तहान-भूकही सारी सरली-नकळत सर्व देह-भान हरपली ... सहज अलगद राधा-राधा-राधा, "धारा-धारा-धारा" बनली ...
जुळले-जुळले वाटती, नाजूक कोमल धागे ... कोण असे तो वीणकर, काहीच कसे ना उमगे ? हा भास, स्वप्न कीं सत्य, का ना कुणी मज सांगे ? बिंब दिसे प्रति-बिंबा, चाहूल कशी मग न लगे ?
कातरवेळ झाली अन् लागते अनावर ओढ ... जणू वेडया राधेची, खट्याळ कान्हा काढी खोड सांज-लालीमा पसरुनी, गाली दिसतसे गोड ... द्वैत आणि अद्वैताची, अद्वितीय अशी ही जोड
Leave a Reply