
कविता : 🌷 " आप-पर-भाव "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
झुंझु-मुंझु झालं आणि,
गोड साद आली कानी,
धुंद-मधुर अशा स्वरांनी ...
काळजाचं झालं पाणी ...
माध्यान्हीच्या सुशांत वेळी,
द्वाड कान्हुला, शीळ घाली ...
खट्याळ हरीच्या खोड्यांनी,
पुरती बावरली राधा-भोळी ...
तिन्ही सांज, होऊ घातली ...
गाय-वासरे घराकडे परतली ...
ऐकूनी कान्हाची सुरेल मुरली,
जणू सृष्टीही देहभान विसरली ...
रजनीचा प्रहर झाला काळा,
सावळा असा तो घन-निळा ...
राधेला पूर्णतः विसर पडला ...
आप-पर-भाव तो पार मिटला ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply